Thursday, February 17, 2011

आठवणींच्या कविता १

एक ओंगळ कविता

(पहिल्या 'पुरुषोत्तम'च्या रिझल्ट नंतर लिहिलेली कविता...)

कितीही लक्ष दिलं, तरी डोक्यात काहीही जात नव्हतं;
लिहायचं ठरवलं, तर पेनच उमटत नव्हतं...
लायब्ररी गच्च भरली होती, कॅंटीनचे कट्टे होते मोकळे;
मेक फ्लोअर, ऑडी... सुन्न सुन्न होते सगळे...
कुठेतरी मनामध्ये सबमिशनचा लोड होता;
कॅंटीनचा रोजचा चहा, काल मात्र आगोड होता...
काल घरी जाताना एकही मुलगी दिसली नाही;
पेपर मधली मॉडेलसुद्धा, काल अजिबात हसली नाही...

घरी आल्यावर आठवडाभराच्या आठवल्या टेस्ट;
म्हटलं आता अभ्यास, टाईम नाही करायचा वेस्ट ...
पण परीक्षेसाठी वाचू म्हटलं, तर पोर्शनच माहित नाही;
जरनल लिहायचं, तर रायटप सापडत नाही...
शेवटी ठरवलं, एवढा प्रयोग झालाच पाहिजे कम्प्लीट;
निर्धारानी बसलो, पण तेवढ्यात गेले लाईट...

कॅण्डलच्या प्रकाशात मग उगाचच बसलो होतो,
स्वतःशीच चर्चा करत...
Black-out पूर्ण झाला की मगच उठायचं,
उगाचच आठवलं परत परत...
मग ठरवलं, झकास पैकी म्हणू गाणी,
कसं कोण जाणे, पण डोळ्यात दाटलं होतं पाणी...

प्रत्येक दिवस, प्रत्येक स्ट्रेच, प्रत्येक क्षण आठवला,
स्ट्रेचच्या आधी केलेला प्रत्येक पण आठवला...
Energy, मोठा आवाज, टायमिंग, बेअरिंग;
एन्ट्री, एक्झिट प्रत्येकवेळी, फक्त फक्त दुसरी विंग...
घाबरायचं नाही, बिनधास्त, प्रत्येकवेळी घ्यायचा लाईट
फोकस मुळीच सोडायचा नाही, ग्रीन रूम मध्ये बसायचं क्वाईट...
आठवल्या चुकलेल्या टाळ्या, आठवला दोन दिवसात बसवलेला चौथा सीन;
आठवलं म्हणलेलं, 'पाहिलंस... मी तुमचा बाप', कडक तिसरा सीन...
आठवले एकत्र खाल्लेले डबे, आठवलं ज्ञानेश्वर, जोगराम, सुहाग;
आणि उगाचच केलेलं चर्वण, कॅंटीनचा क्रीमरोल टपरीपेक्षा का महाग ?


मघाशी रायटप शोधताना वर आलेला 'गोष्टीचा' कागद,
उगाचच हातात आला;
मग मात्र आसवांवरचा संयम, पूर्ण सुटला...
कळलं आता मेणबत्तीचा प्रकाशसुद्धा धोका देईल,
भिंतीवरचं घड्याळ उगाच साडे-आकराचा ठोका देईल!

झटकन मान फिरवली, डोळे गच्च मिटून घेतले;
गालावर ओघळलेले दोन थेंब, तेवढ्यात बहुतेक चमकून गेले...
'काय करतोयस ?' आई म्हटली, म्हटलं 'जरा झोपतो आत',
विचार थांबतील दोन क्षण, मी उठण्याची वाट पहात...
कॉटवर झोपताना गुडघा दणकन आपटला,
म्हटलं 'सैतान त्रिफोन तुझ्यामुळेच !'
मनातले विचार, खरंच... खुळेच...

लाईट आले, चेहेरा झाकत म्हणालो 'शीट !'
मुझिक, लाईट्स, सेट, डायरेक्शन.. सगळंच होतं की परफेक्ट फिट...
तेवढ्यात आई म्हणाली, 'जरा घे खाऊन',
भरले डोळे, ओले गाल, म्हटलं 'येतो हात धुवून'...
जेवायला बसलो, तर ताटात होतं पिठलं;
आईला कसं सांगणार, जेवणावरचं लक्ष दुपारीच उडलं...

पहिला घास घेतानाच खणाणला फोन,
'कसं झालं नाटक?', आजीचा टिपिकल टोन...

म्हटलं आजी चांगलं झालं
पण आमचं रिकामं खातं,
एक बक्षीस आहे बरं का
बाकी बहुतेक परीक्षकांशी जुळलं नाही नातं...

आजी म्हणाली 'अरे वेड्या, प्रयत्न करत रहा...
अरे आज नाही तर उद्या मिळेल,
काहीतरी नवीन, चांगलं केल्याचं समाधान तर पहा'
मी म्हटलं 'खरय, प्रयत्न करणं आमचं काम आहे,
आता फक्त अडीच महिने आराम आहे !'

फोन ठेवला, कळलं, च्यायला आपण खरंच सांगितलं...
"माणसाचा स्वभाव सूर्यप्रकाशासारखाच, न बदलणारा"
हे त्या 'माणसांना' का नाही कळलं ??

7 comments:

  1. Khoop khoop bhari kawita...!!!!! ek unmber ahe swandya... !!! ekdm sagla cultural cha ayushya dolyansamorun gela...!!!
    khooop bhari... !

    ReplyDelete
  2. Too good Swanand ...Nice poem....Untill the time when I became closely associated with you...I never knew the joy which one gets by participating in plays and other cultural activities...Hats off to you that I enjoyed my stay at IITK for the same reason....Very nice poem ...keep it up

    ReplyDelete
  3. ..swandya....
    dar veli asa hota... me lab madhe baslela asto..facebook var tuza blog update zalay dista.. mag me vichar karto ki swandya cha blog ekdam manapasun vachayla asa kasa ekdam "mood" lagel... "coding karta karta asa kasa bhavna vagaire wala mood yeil kawitecha" vagaire vatta... mag general najar taku mhanun baghitla tar kadhi mood senti kade switch hoto te kalat pan nai chyayla...
    khup chhan kawita... Bhidlich ekdam ... kasahee mood asla-nasla tari gheunach jato tu mage ekdam..

    thanks swandya :)

    ReplyDelete
  4. कॅण्डलच्या प्रकाशात मग उगाचच बसलो होतो,
    स्वतःशीच चर्चा करत...
    Black-out पूर्ण झाला की मगच उठायचं,
    उगाचच आठवलं परत परत...

    la TODLAS....

    ReplyDelete
  5. thanks a ton bappa... :) kay bolu ata... asa 'kavita lihu' mhanun basala ki mala kadhi kahi lihitach yet nahi...ugich bhaltyach kamat astana kahitari suchun jata... ani lihayala lagala ki ekdam mood badalunach jato... tyat odhala jata... tu wachatana hi cycle complete hote mhanayachi... :) chhan watatay... parat ekada khup khup dhanno a.k.a. dhanyawad... :D

    ReplyDelete
  6. :-) asach raha swandya..n asach lihit raha :-)

    ReplyDelete
  7. एखाद्या परिस्थितीमध्ये फार जीव ओतुनही मनासारखे रिझल्ट्स येत नाहीत. पण आपली काहीच तक्रार नसते. जीव ओतल्यामुळे ती वेळ आपल्या मालकीची झालेली असते. कधीकधी सहज मिळालेल्या यशापेक्षाही तो संघर्ष सुंदर वाटतो. यश काही क्षणांपुरत तर तो संघर्ष आयुष्यभर आठवत राहतो, आपल्याला शक्ती देत राहतो.

    कविता खूप सुंदर झाली आहे.

    ReplyDelete